Blog

लोकसभा निवडणूकीची तयारी करणाऱ्यांसाठी आवश्यक बाजू नक्की वाचा..

निवडणूक व्यवस्थापन कंपन्या


सध्या देशाला उत्सुकता लागू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या तारखा येत्या काहीच महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक पक्षांपासून ते राष्ट्रीय पक्षांपर्यंत सर्वांनीच यासाठी आपली खंबर कसली आहे. प्रतिपक्षाला निवडणूकीत धूळ चारण्यासाठी आणि मतदारांच्या सर्वाधिक मतधिक्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी रणनीती आखून त्यानुसार हे पक्ष आप-आपल्या परिने काम करत आहे. मात्र, या कामांना पुर्णत्वास नेण्यासाठी महत्त्वाचा भाग ज्यांच्या खांद्यावर द्यावा लागतो तो भाग निवडणूक व्यवस्थापन कंपन्या सांभाळत असतात. याच निवडणूकीचे योग्यरित्या व्यवस्थापन करून उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी काम करणाऱ्या या कंपन्यांविषयी आणि त्यांच्या कामाविषयी आपण या लेखातून माहिती घेऊयात..

निवडणूकीत या कंपन्यांची भुमिका काय असते?

निवडणूक जाहिर होण्यापूर्वी मतदारांवर कोणत्या पक्षाचे गारूड आहे. मतदार कोणत्या उमेदवारांना पसंती देण्यासाठी उत्सुक आहेत याचा प्राथमिक कौल ‘ओपिनीयन पोल’च्या माध्यमातून या कंपन्या काढत असतात. या पोलमुळे कोणत्या उमेदवाराकडे मतदारांचा कल अधिक आहे. कोणत्या उमेदवारावर मतदार नाराज आहेत. विकासकामांवर मतदार किती समाधानी आहेत यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. या उत्तरांवर काम करत आपल्या क्लाइंट असलेल्या उमेदवाराच्या विजयाची रणनीती या कंपन्या बनवत असतात.

३६० डिग्री निवडणूक रणनिती आखणे

निवडणूक जिंकण्यासाठी आवश्य असलेल्या सर्व बाबी विचारात घेऊन ग्राऊंडपासून ते सोशल मिडीयावर वातावरण निर्मिती करेपर्यंत ३६० डिग्रीमध्ये या निवडणूक व्यवस्थापन कंपन्या रणनिती तयार करत असतात. यामध्ये विशेषत: निवडणूकीपर्यंत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून कमीत-कमी वेळेमध्ये स्मार्ट प्रचार प्रणालीचा वापर करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत उमेदवारांना पोहचवणे हा निवडणूक व्यवस्थापन कंपन्यांचा मुख्य उद्देश असतो. यात पुढील बाबी महत्त्वपूर्ण ठरतात.

सर्व्हे करून प्रचाराची रणनीती तयार करणे

प्राथमिक स्तरावर सर्व्हे करून मतदारांचा डाटा या कंपन्या मिळवत असतात. याच डाटाचा सकारात्मक वापर करून कोणत्या गावात,विभागात जास्त लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.याचा विचार करून काम करत असतात.

ग्राऊंडवर होणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करणे

ग्राउंडवर कार्यकर्ते किंवा व्यवस्थापन टिमने काय केले पाहिजे या सर्वांचे नियोजन एकाच जागेवरून व्हावं यासाठी वॉर रूमची निर्मिती केली जाते. या रूममधून सर्व बाबींवर अभ्यास करून रणनीती अमलात आणण्यासाठी निवडणूक रणनीतीकार योजना आखत असतात. तसंच विविध सुचना टिमला करत असतात.

सोशल मिडीया टिम

या वॉर रूममधून सोशल मिडीयाची संपूर्ण टिम काम करत असते.यात विशेषत: सोशल मिडीयाच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रणनीती ठरवली जाते. ही टिम क्रिएटिव्ह वर्क करत असते. जसं की व्हिडीओ तयार करणे, पोस्टर तयार करणे, डॉक्यूमेंटरी तयार करणे इ.

प्रचाराला दिशा देणे

सुरू असलेल्या प्रचारात कुठे कमी पडत आहोत,याचे योग्य विश्लेषण करून त्यानुसार सुधारित रणनीती बनवली जाते. या रणनीतीनुसार प्रचाराला योग्य दिशा देण्याचं काम या वॉर रूममध्ये केलं जातं. तसंच मतदारसंघाचा आवाका लक्षात घेता, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत उमेदवार पोहचावा यासाठी काम करणे.

जनसंपर्क दांडगा करणे

निवडणूकांमध्ये उमेदवाराचा जनसंपर्क दांडगा करण्याचं काम याच वॉर रूम मधून केलं जातं. यात विशेषत: मतदारांशी संपर्क वाढवणं,त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या भावना समजून घेणं. त्यांना वेळ देणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं, रात्री-अपरात्री अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जाणं इ.गोष्टी या वॉर रूमच्या माध्यमातून उमेदवारासाठी केल्या जातात.यातून उमेदवाराचा जनसंपर्क वाढवणं हा एकमेव हेतू असतो.

विरोधी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना क्षमवणाऱ्या गोष्टी करणे

अनेकदा विरोधक उमेदवारावर भारी पडू शकतो.अशावेळी विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना वरचढ ठरतील अशा गोष्टी करणं यालाच योग्य रणनीती वापरणं असं म्हटलं जातं.याच नियोजनासाठी टिममध्ये समन्वय असणं गरजेचं आहे आणि याच साठी ही वॉर रूम काम करत असते.

वरील बाबी विचारात घेऊन उमेदवारांना विजयापर्यंत पोहचवणे हे निवडणूक व्यवस्थापन कंपनीचे महत्त्वाचे काम आहे आणि हेच काम महाराष्ट्रातील नावाजलेली आचार्य इलेक्शन मॅनेजमेंट ही संस्था कौशल्यबद्ध रितीने पार पाडते.